पाकिस्तान आला घायकुतीला ? ‘पाकिस्तानने धडा शिकला आहे’- शहबाज शरीफ, पंतप्रधान मोदींकडे आर्जव, ‘चला बसून बोलू’

पाकिस्तानचे आर्थिक संकट: शहबाज शरीफ म्हणाले की, "मी भारतीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की आपण वाटाघाटीसाठी एकत्र यावे , पाकिस्तानला तीन युद्धांतून जो काही धडा मिळायचा होता तो मिळाला आहे."

ऋषभ | प्रतिनिधी

17 जानेवारी 2023 : विदेशनीती / सामरीक कूटनीती / मुत्सद्देगिरी

India-Pakistan 2019: युद्ध के मैदान से शांति की दहलीज तक का सफर

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ  यांनी सांगितले की, सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. तेथील लोकांना खायला पीठ मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक विधान समोर आले असून, त्यात शेजारी देशाचा आवाज बदलताना दिसत आहे. पाकिस्तानने धडा शिकला असून आता त्याला शांततेत राहायचे आहे, असे पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले. 

Politics first for flood hit Pakistan as it denies aid from Bangladesh
“आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढली आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी आम्हा लोकांवर अधिक गरिबी आणि बेरोजगारी आणली आहे. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत आणि आम्हाला शांततेत जगायचे आहे.” शाहबाज उवाच!

अल अरेबियाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्येक समस्येवर चर्चा करण्यास तयार आहेत. शाहबाज शरीफ म्हणाले की, मी भारतीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की, आपण चर्चेच्या टेबलावर बसून प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पाकिस्तानने धडा घेतला – शाहबाज
पाकिस्तानी पंतप्रधान भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा आग्रह करत म्हणाले की, आम्ही शेजारी आहोत. शांततेत जगणे हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रगती करा किंवा एकमेकांशी लढा आणि वेळ आणि संसाधने वाया घालवा.” ते पुढे म्हणाले, “आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढली आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी आम्हा लोकांवर अधिक गरिबी आणि बेरोजगारी आणली आहे. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत आणि आम्हाला शांततेत जगायचे आहे.

चर्चेसाठी आग्रहवजा संदेश

शहबाज शरीफ म्हणाले की, “आम्ही आमची समस्या सोडवण्यासाठी तयार आहोत.” पंतप्रधान मोदींना माझा संदेश आहे की चला एकत्र बसून बोलू . बॉम्ब आणि गनपावडर बनवण्यासाठी आम्ही आमची संसाधने खर्च करू नयेत, अशी पाकिस्तानची इच्छा आहे.” 

हेही वाचाः FIRE | पिळर्ण येथील बर्जर बेकर पेंट कंपनीत अग्नितांडव  

पाकिस्तानने तीन युद्धे केली आहेत

  • पाकिस्तानने भारतासोबत तीन वेळा थेट युद्ध केले आहे आणि तिन्ही वेळा ते हरले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध 1965 मध्ये झाले. त्यावेळी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते आणि जनरल याह्या खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात लष्करी राजवट होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हाहाकार माजवला होता. ताश्कंद करारानंतर हे युद्ध संपले .
The 1965 Indo-Pak conflict: A war thrust upon the nation -Governance Now
  • १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरे युद्ध झाले. या युद्धात पाकिस्तानचा असा मानहानीकारक पराभव झाला होता, ज्यातून तो आजतागायत सावरू शकलेला नाही. 71 च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात भारताने अमेरिकेसारख्या महासत्तेचा दबाव धुडकावून लावला. या युद्धात पाकिस्तानच्या ९० हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. यानंतर भारताच्या लष्करी रणनीतीचे जगभरातून कौतुक झाले.
Afghanistan VP Amrullah Saleh attacks Pakistan with 1971 Indo-Pak photo -  Times of India
  • 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानने तिसरे युद्ध पुकारले होते. या दरम्यान पाकिस्तानी सैनिक हिवाळ्यात गुपचूप येऊन शिखरावर जाऊन बसले. पुढे भारताने मोठी मोहीम राबवून सर्व चौक्या काबीज करून पाकिस्तानला पुन्हा एकदा आरसा दाखवला. सुरुवातीला पाकिस्तानने या युद्धात आपल्या सैनिकांची उपस्थिती नाकारली होती, परंतु नंतर त्यांच्या नेतृत्वाने हे मान्य केले की हे तत्कालीन जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या मेंदूची उपज होती. पाकिस्तानी सैन्य भारताकडून हा भाग हिसकावून घेईल अशी आशा मुशर्रफ यांना होती, पण भारताच्या शूर सैनिकांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
Kargil Vijay Diwas: India pays tributes to its fallen heroes | India  News,The Indian Express

आता भारत या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता संपूर्ण जागतिक स्तरावर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!