VIRAL FACT CHECK |2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागील सत्य, जाणून घ्या

सदर मेसेजची सत्यता तपासली गेली आहे. या तपासणीत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा निघाला.

ऋषभ | प्रतिनिधी

सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, “आयएमएफचा आणखी एक हृदय पिळवटून टाकणारा अहवाल समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आर्थिक अहवालानुसार, 2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब असेल. अभूतपूर्व चिंताजनक परिस्थिती. मोदींनी देशाचे भविष्य धोक्यात आणले आहे. भारत आता विकसनशील देश राहिलेला नाही.”

या मेसेजची सत्यता गेली तपासली आहे. या तपासणीत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा निघाला. बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2025 पर्यंत भारतापेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. पण याचा थेट अर्थ असा नाही की 2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब होईल. भारत हा एक ‘उज्ज्वल स्थान’ राहिलेला देश आहे. भारत 2023 मध्ये जागतिक विकासामध्ये 15% योगदान देणार आहे.

AI चा संभाव्य विस्तार पाहून त्याच्या प्रणेत्यांनाच भरली धडकी; जगातील 1000 तज्ञांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास थांबवण्याचे आवाहन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!