तीन महिन्यात पहिल्यांदाच 50 हजारपेक्षा कमी रुग्ण! रुग्णसंख्या घटल्यानं मोठा दिलासा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केलेत. गेल्या 24 तासांत आढळलेल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर 50000 (46,790) पेक्षा कमी आढळली आहे. याआधी, 28 जुलै रोजी रुग्णांची एका दिवसातली संख्या 47,703 असल्याची नोंद आहे.
दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने कमी होत आहे. भारताने मिळवलेले आणखी एक यश म्हणजे, एकूण संख्येच्या तुलनेत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7.5 लाखांपेक्षाही कमी (7,48,538) आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे हे प्रमाण 9.85% इतके आहे.
#IndiaFightsCorona#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 20, 2020
The total recovered cases have crossed 67 lakhs (67,33,328).
69,720 patients have recovered and discharged in the last 24 hours.
78% of the new recovered cases are observed to be concentrated in 10 States/UTs . pic.twitter.com/s95r9jbTx9
रिकवरी रेटमध्ये मोठी वाढ
सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना दुसरीकडे मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 67 लाखांपेक्षा अधिक रुग्ण (67,33,328) या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून, आज ही तफावत 59,84,790 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत 69,720 रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 88.63% इतका आहे. बरे झालेल्या रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्रात एका दिवसात, सर्वाधिक 15,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर त्या खालोखाल कर्नाटकात एका दिवसात 8,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत 5,000 पेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळलेत.
#IndiaFightsCorona#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 20, 2020
India is the only country with the highest recoveries and continues to have one of the lowest fatality rates globally. Today it stands at 1.52%.
These have in tandem resulted in the consistent slide in the active cases. pic.twitter.com/ulg0a3Ozuc
गेल्या 24 तासांत देशभरात 587 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 81% टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 600 पेक्षा कमी आढळला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 125 मृत्यूंची नोंद झाली.
कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे, तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आज हा मृत्यूदर 1.52% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या घटीचा हा परिणाम आहे.
#IndiaFightsCorona#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 20, 2020
India crosses Significant Milestones.
The new confirmed cases have fallen below 50,000 (46,790) for the first time in nearly three months.
The new cases were 47,703 on 28th July.https://t.co/trx0xLfmtW pic.twitter.com/qgfrw8Xhbi