कशेडी घाटात खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

भीषण अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरीत खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका लहान मुलाचा मृत्यू झालाय.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळून हा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तात्काळ बचावकार्य सुरु करत २५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुर्दैवाने सात वर्षाच्या एका लहान मुलाला अपघातात जीव गमवावा लागला आहे. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजलं नसून पोलीस तपास करत आहेत.

गाडीतील बहुतेक प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं कळतंय. अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही. पोलिस या अपघाताप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देवगड फणसगाव येथील ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. साहिल राजेंद्र राण असे मृत मुलाचे नाव आहे. तो आपल्या आजीसोबत कासार्डे देऊळवाडी इथ येत होता. मात्र या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुंबई नायगाव येथून त्याचे आई- वडील घटनास्थळी दाखल झालेत. संध्याकाळी फणसगाव इथ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस पाटील वैजयंती नर यांनी दिलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!