दुर्दैवी! बसला आग, आगीत होरपळून 6 जणांचा बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : राजस्थानच्या जालोरमध्ये शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता बसला ११ हजार वोल्टच्या हायटेंशन लाइनमुळे आग लागली. या दुर्घटनेत सहा लोक जळून मरण पावले. ३६ लोक या आगीत होरपळले आहेत.
हेही वाचा – बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

सर्व लोक जैन समाजाचे आहेत. हे सर्वजण नाकोडा तीर्थाचे दर्शन करून अजमेर आणि ब्यावर येथे परतत होते. गूगल मॅपवरुन ब्यावरचा रस्ता पाहत असताना बस चुकून महेशपूरा गावात पोहोचली. गावाच्या गल्लीमध्ये अकरा किलो व्होल्ट केवीची लाइन खूप खाली होती. कंडक्टर तारांखालून बस सुटेल का हे पाहण्यासाठी बसवर चढला आणि तार हटवू लागला. याच वेळी करंट बसमध्ये पसरला आणि संपूर्ण बसने पेट घेतला.

अचानक लागलेल्या आगीमध्ये बसमधील ६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. तर ३६ जणांना आगीची झळ पोहोचली. या भीषण आगीमध्ये बस जळून खाक झाली. यामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.
Rajasthan: Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district, late last night (January 16).
— ANI (@ANI) January 16, 2021
"The injured have been referred to Jodhpur", said Additional District Collector, Jalore. pic.twitter.com/TCXNVpImqv
पंतप्रधानांनीही व्यक्त केलं दुःख
राजस्थान के जालौर में हुए बस हादसे की खबर से अत्यंत दुख पहुंचा है। इस दुर्घटना में कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। मैं उनके परिवार वालों के प्रति अपनी संवेदनाएं प्रकट करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 17, 2021
हेही वाचा – Video | एकीचं बळ! दरीत पडलेल्या ट्रकला वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवटला
महाराष्ट्रात मोठी दुर्घटना! नवजात बालकं आगीत होरपळून दगावली, मातांचा आक्रोश