पडद्यामागील “मन की बात”: पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चे बिहाइंड द सीन्स; असा होतो एपिसोड शूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होत आहे, त्या निमित्त घेतलेला हा आढावा

ऋषभ | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात चा एक एपिसोड नियमित प्रसारित झाला आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडींंवर प्रामुख्याने कोविड संकटात नरेंद्र मोदी यांनी या रेडिओ कार्यक्रमाद्वारा जनतेला संबोधित केलं. आज 100 व्या एपिसोडच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नेमकं मन  की बात चं रेकॉर्डिंग कसं होतं याचा व्हिडीओ जनतेसोबत शेअर करण्यात आला आहे.

Mann Ki Baat Live Updates: PM Narendra Modi to address nation today amid  Covid-19 surge, PM Modi Speech Live

सदर कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान 7 लोककल्याण मार्गावर रेकॉर्ड करण्यात आला आहे . यापेक्षा कितीतरी पटीने मोठी तयारी आजच्या शंभराव्या पर्वाची झाली आहे. आज, पंतप्रधान मोदींचा 100 वा मन की बात कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केला जाईल. मी तुम्हाला सांगतो, मन की बातचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित केला जातो.  

जरूर वाचा : SOCIO-POLITICAL VIEWS THAT TRANCENDS..|भाजपची नवी राजकीय खेळी ! ‘कॉँग्रेस फाइल्स’ मधून कॉँग्रेसवर केले भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप

मन की बात ने केले सर्व सामन्यांच्या मनावर गारूढ

सेल्फी विथ डॉटर, घरगुती खेळण्यांची जाहिरात आणि कोविडच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे आतापर्यंत झालेल्या प्रसारणात खूप यशस्वी ठरले. त्याच वेळी, जेव्हापासून पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला, तेव्हापासून देशात रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

MyGovIndia on Twitter: "Let's make the 100th episode of Mann Ki Baat more  magnificent! Share your ideas on how to celebrate the 100th episode of Mann  ki Baat. Visit: https://t.co/ljiQ9qKaR2 https://t.co/GG68WH3NWo" /

मन की बातचा 100 वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भाजप आणि सरकारने रोडमॅप तयार केला आहे. तो यशस्वी करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण ऐकण्यासाठी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनी विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांची उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आज भाजपचं टार्गेट..

भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना आपापल्या मतदारसंघातील निवडक ठिकाणी लोकांसह हे प्रसारण ऐकण्यास सांगण्यात आले आहे.  एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऐकण्याचा रेकॉर्ड बनवण्याचे लक्ष्य या रेडिओ प्रक्षेपणावर ठेवण्यात आले आहे. सर्व खासदार सुमारे 1000 लोकांसह हे विशेष प्रसारण ऐकतील. पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने देशभरात 2150 ठिकाणी हे प्रसारण ऐकण्याची व्यवस्था केली आहे. याद्वारे 4-5 लाख लोकांना जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, “देशभरात 4 लाख ठिकाणी मन की बात आणि माझ्या संसदीय मतदारसंघातील पटना साहिब लोकसभेत 600 हून अधिक ठिकाणी. सामान्य जनता, कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी मन की बातच्या 100 व्या आवृत्तीचे साक्षीदार होतील.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!