JAPAN’S PM VISITS INDIA : जपानचे पंतप्रधान भारतात पोहोचताच राजघाटावर पोहोचले, महात्मा गांधींना वाहिली आदरांजली, पंतप्रधान मोदींशी चर्चा
जपानचे पंतप्रधान भारतात : जपानचे भारतासोबतचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

भारत जपान संबंध: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज (२० मार्च) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीला पोहोचल्यावर जपानचे पंतप्रधान सर्वप्रथम राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी राजघाट येथे अभ्यागत पुस्तकावर स्वाक्षरी केली आणि त्यांना महात्मा गांधींच्या चरित्रावर लिहिलेली पुस्तके भेट देण्यात आली.
राजघाटावरून जपानचे पंतप्रधान थेट दिल्लीतील हैदराबाद हाऊसवर पोहोचले, जिथे पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. येथे दोन्ही बाजूंनी शिष्टमंडळ स्तरावर परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच G7 आणि G20 च्या आपापल्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या प्राधान्यांवर चर्चा केली.
Fumio Kishida PM बनताच त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भारतात आले.
Fumio ऑक्टोबर 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. त्यांच्या आधी योशिहिदे सुगा हे जपानचे पंतप्रधान होते. किशिदा फुमिओ यांनी पंतप्रधान होताच त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली होती. ते 19 मार्च ते 20 मार्च 2022 या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी पीएम मोदींसोबत 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला.
डिसेंबर 2015 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत भेटीवर आले होते. तेव्हापासून भारत आणि जपानमधील मैत्री उच्च पातळीवर पोहोचू लागली आहे. भारत आणि जपान यांच्या मैत्रीचा इतिहास मोठा आहे. जपानची भारतातील गुंतवणूक आठ वर्षांत दुप्पट झाली आहे. 2013 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतात थेट गुंतवणूक दुप्पट झाली. 2013 मध्ये थेट गुंतवणूक 210 अब्ज येन होती, जी 2021 मध्ये वाढून 410 अब्ज येन झाली.
