राज्यात उष्णतेच प्रमाण वाढतय

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. पहाटे थंडी आणि दिवसभर उकाडा यामुळे वृध्द आणि लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात गेल्या 60 वर्षातील सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. त्यातच कोरोना विषाणुचा प्रसार. त्यामुळे पाऊस आणि कोरोना या दोन्हीमुळे गोमंतकीय जनता मेटाकुटीला आली होती. पाऊस कमी झाल्याने आता हळूहळू कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत आहे. मात्र आता लोकांना उष्णतेचे दाहक चटके सहन करावे लागत आहेत. साधारणतहा राज्यात दिवाळी नंतर थंडी सुरु होते. पण यंदा सकाळच्या सत्रात थंडी पडते नंतर दिवसभर ते मध्यरात्रीपर्यंत उकाडा सुरु होतो. पुढील काही दिवस उकाड्याचे प्रमाण असेच राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.