संसद सदस्यत्व रद्द झाल्यावर राहुल गांधींचा भाजपवर निशाणा – माझे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत !

राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केल्याने देशभरात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. राहुलबाबत दिल्लीपासून मुंबईपर्यंत गदारोळ सुरू आहे. दरम्यान आज राहुल गांधी त्यांचे सदस्यत्व आणि अपात्रतेबाबत माध्यमांसमोर आले आहेत.

ऋषभ | प्रतिनिधी

राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केल्याने देशभरात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. राहुलबाबत दिल्लीपासून मुंबईपर्यंत गदारोळ सुरू आहे. दरम्यान आज राहुल गांधी त्यांचे सदस्यत्व आणि अपात्रतेबाबत माध्यमांसमोर आले. त्यांच्या शिक्षेवर आणि संसदेतून अपात्रतेवर राहुल गांधी म्हणाले की, भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे. अदानी यांच्या शेल कंपन्या आहेत. त्यात कुणी 20 हजार कोटी रुपये गुंतवले. हे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? हा प्रश्न मी विचारला. राहुल म्हणाले की, अदानींच्या कंपन्यांकडे चिनी पैसा आहे.

“अदानी आणि मोदी यांचे नाते नवीन नाही, ते खूप जुने आहे”

राहुल गांधी म्हणाले की, अदानी आणि मोदी यांचे नाते नवीन नाही, ते खूप जुने आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनचे नाते आहे. मी संसदेत पुरावे दिले, अदानी आणि पीएम मोदी यांच्यातील संबंधांवर बोललो. नियम बदलून अदानींना विमानतळ देण्यात आले, याबाबत मी संसदेत बोललो. माझ्याबद्दल संसदेत मंत्री खोटे बोलले, असे राहुल म्हणाले. मी परकीय सैन्याची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला. राहुल म्हणाले की, परदेशातून मदत मागितली नाही. मी स्पीकरला पॉइंट टू पॉइंट रिप्लाय दिला. माझ्या भाषणाचा काही भाग हटवला गेला. 

“स्पीकरने मला बोलू का दिले नाही”


राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. नरेंद्र मोदींशी अदानींचा काय संबंध? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझी सदस्यत्व रद्द करा, ते मला धमकावून, धमक्या देऊन, तुरुंगात पाठवू शकतात. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.” मला स्पीकरने का बोलू दिले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते मला धमक्या देऊन गप्प करू शकत नाहीत. मी कोणाला घाबरत नाही, देशहितासाठी बोलत राहीन. मला अपात्र ठरवून माझा आवाज बंद करू शकत नाही. 

“ विषय ओबीसीचा नाही, मोदी आणि अदानींच्या नात्याचा विषय आहे”


राहुल गांधी म्हणाले की, मी जनतेमध्ये राहणार, माझे भारत जोडो यात्रेचे कोणतेही भाषण पहा, मी नेहमीच म्हणत आलो की सर्व समाज एक आहेत. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही, नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा मुद्दा आहे. भाजप लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम करते, कधी ओबीसींबद्दल बोलते, तर कधी इतर मुद्दे विनाकारण उगाळून काढते.

“माझे नाव सावरकर नाही…”


काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेत असो की बाहेर याने मला काही फरक पडत नाही. मला माझी तपश्चर्या करायची आहे, ते करून दाखवीन. माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत. राहुल गांधी म्हणाले की, वायनाडशी माझे कौटुंबिक नाते आहे. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. सरकारने आम्हाला लढण्यासाठी शस्त्रे दिली आहेत. पंतप्रधान मला घाबरतात, त्यामुळेच माझे सदस्यत्व गमावले, असे राहुल म्हणाले. मला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांचे आभार. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!