म्हादईचं राजकारण, आणि तुम्ही आम्ही…
किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजी : म्हादई वादावर ऍड अरविंद दातार हे सरकारची बाजू मांडत होते. त्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांनी राज्य सरकारला अपेक्षित अशी कामगिरी न केल्यानं त्यांना हटवण्यात आलं आहे.
म्हादईचं पाणी पळवण्यास आतूर कर्नाटकनं कणकुंबीतील प्रत्येक हाचलाचींवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण सज्जता केलीय. केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर यांच्या गोवा भेटीवेळी त्यांनीही गोमंतकीयांच्या रोषाचा अंदाज घेतला. गोव्यानं दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर कर्नाटकच्या नेत्यांचं पित्त खवळलंय. गोव्याला याचे परिणाम भोगावे लागतील असं धमकीवजा विधानही त्यांनी केलंय. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच म्हादईवर सविस्तर चर्चाही झाली. पण खरंच आता म्हादई गोव्याची राहिली आहे का? नेमकं हे सगळं राजकारण सुरु कुठून झालं आणि याचा शेवट नेमका कसा होऊ शकतो, त्याचा केलेला हा पंचनामा..